कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न काव्यशैली. 'सहवास' हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. 'शेला', 'मेंदी', 'मृगजळ', 'रंगबावरी', 'बाहुल्या', 'गर्भरेशीम' इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. 'श्यामली', 'चैतू हे कथासंग्रह व 'मृद्गंध', 'मालनगाथा' हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या गर्भरेशीम' या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे. उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही असह्य आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. घराघरांत, शेताशेतावर आवश्यक पूर्वतयारी झाली आहे. अशा वेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजे मेघमालेला केलेले आवाहन, धाडलेला निरोप भावरम्य आहे. ग्रामीण भागातील घराघरांतून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे वर्णन समर्पक शब्दांत कवितेत आले आहे. ही तयारी झाल्यावर पावसाची आळवणी केली आहे. कवितेचा अर्थ 'पीठ कांडते ....................................गुंतून?' जणू काही आभाळात राक्षसीण धान्य कांडत असावी इतके कडक ऊन पडले आहे. उन्हाळा संपत आलेला असला तरी उन्हाचा ताप असह्य होत आहे. उन्हाच्या तडाख्याने जीव हैराण/कासावीस झाला आहे. अशावेळी प्राणसई (माझी प्राणप्रिय सखी) मेघमाला, कोणत्या कामात गुंतून राहिली बरे? दिला पाखरांच्या मैत्रपणा आठवून..." तुझ्या प्रतिक्षेत असलेली मी तुझ्या भेटीसाठी इतकी आतुर झाले आहे, की माझा निरोप तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावा म्हणून मी तो पाखरासोबत धाडला आहे. हे सखी घनावळी, आपल्या दोघींची ती दृढ मैत्री आठवून आतातरी तू लवकर ये पडवळ........... तू आलीस म्हणजे तुझ्या मागोमाग तो वरुणराजा येईलच तो येणार म्हणून घराघरांत, शेताशेतावर पूर्वतयारी सुरू आहे. पावसात बहरणाऱ्या पडवळ, भोपळा अशा वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी तयार केलेल्या मातीच्या आळ्या मी भाजून ठेवल्या आहेत. सुकलेल्यागोवऱ्यांचा ढीग मोडून त्या गोवऱ्या घरात नीट रचून ठेवल्या आहेत. 'बैल झाले ................उन्हाच्या लागून, उन्हाचा ताप मुक्या गुरावासरांना इतका असह्य होत आहे, की मालकाने गाई गुरांना आता गोठ्यात दावणीला बांधून ठेवले आहे. पावसाच्या चिंतेने त्यांचे मालक अस्वस्थ झाले आहेत. तापल्या उन्हाच्या गरम झळा न सोसवल्यामुळे लहानग्याजीवांची तोंड सुकून गेली आहेत. 'विहिरीच्या ... ......................तू सांग? कडक उन्हामुळे विहिरी आटल्या आहेत. विहिरीच्या खोल तळाशी थोडेसेच पाणी शिल्लक आहे. सूर्यकिरणे पडल्यामुळे ते पाण्याचे गोलाकार भिग जणू चकाकत आहे. माझे मन घरात रमत नाही, तू कधी येशील बरे? 'ये ग दौडत ............स्वप्नांवर मेघमाले, तू धावतपळत आधी माझ्या शेतावर बरस पाहू! तू बरसशील, तेव्हा तुझ्या येण्याने शेते हिरवीगार होऊन जातील, म्हणून शेतीभाती भरघोस पिकण्यासाठी व शेतमालकांचे हिरवे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तू ये. 'तशी झुलत....................... तशीच डुलतझुलत तू माझ्या घराजवळही ये. तुझ्यातून बरसणाऱ्या, चमचमणाऱ्या सरीमध्ये तुझे भाचे मनसोक्त खेळतील. 'आळे वेलाचे,...................चिंब चिंब; मी भाजीपाल्यासाठी तयार केलेली आळी तुझ्या पाण्याने भिजू दे, विहीर काठोकाठ भरू दे. माझे सर्व घरदार पावसाने शिपून निघू दे. उभी राहून...........कौतुक सांगेन...' तू अशी पाऊस घेऊन आलीस, की मी दारात उभी राहून तुझ्या सोबत खूप गप्पा मारेन माझा सखा काळ्या आईची सेवा करण्यासाठी, हिरवे स्वप्न फुलवण्यासाठी शेतात दंग होऊन काम करत असेल, त्याचे कौतुक तुला सांगेन. 'कांग वाकुडेपणा हा, ..............वा्यावरून भरारी. मी इतकी विनवणी करत आहे, तुला निरोप धाडत आहे; पण तू मनात अढी धरून का बरे बसली आहेस? तू माझ्याकडे अशी पाठ का फिरवली आहेस? ये ग, प्राणसई ये. वा्यावर स्वार होऊन तू लवकर मला भेटायला प्रणासई ( स्वाध्याय ) (१) (अ) चौकटी पूर्ण करा. (१) कवयित्रीने जिला विनंती केली ती (२)
कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा (३) कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी (४) शेतात रमणारी व्यक्ती (आ) कारणे लिहा : १) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत. (२) बाळांची तोंडे कोमेजली; कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत. (इ) कृती करा. कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा : उत्तरे: १) वेलाचे आळे भिजू दे. २) विहीर तुडुंब भरू दे. ३)घरदार चिंब होऊ दे. ४) दारात उभी राहून सख्याचे कौतुक सांगू दे. (२) (अ)पुढील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा : १) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर : उन्हाने शेते पोळली आहेत. त्यामुळे शेतकरी बेचैन आहेत. बैल ठाणबंद झाले आहेत. म्हणून कवयित्री घनावळीला विनवते की, तू आधी धावतपळत लवकर माझ्या शेतावर ये. (२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशी : उन्हाच्या झळांनी बाळांची तोंडे कोमेजली आहेत. त्या बाळांना आनंद वाटावा म्हणून कवयित्री प्राणसई घनावळीला सांगते की, तू झुलते झुलत, रिमझिम करत माझ्या घरापाशी ये. (३) विहिरीच्या तळीं खोल दिसू लागले ग भिंग : कडक उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे. विहिरीचा खोल आ) खलील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.
(काव्यसौंदर्य) (अ) खलील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा : (१) 'का गं वाकुडेपणा हा का गं अशी पाठमोरी ? ये गं ये गं प्राणसई वाऱ्यावरून भरारी.’ उत्तर : 'प्राणसई' या कवितेमध्ये कवयित्रीने प्राणसई घनावळ मैत्रिणीच्या नात्याने बरसण्याची विनवणी केली आहे.कडक उन्हाळ्याचा दाह सगळे शेतकरी सहन करत आहत. पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत. उन्हाच्या झळा लागून बाळाचे चेहरे कोमेजले आहेत. घरातील मंडळींची मने उदास झाली आहेत. शत उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा अवर्षणाच्या वेळी कवयित्री पावसाळी ढगांची विनवणी करताना म्हणते की, हे प्राणप्रिय सखी, तू अशी विपरीत का वागत आहेस? आमच्याकडे तू पाठ का फिरवली आहेस? वाऱ्यावरून झेप घेत तू लगबगीने खाली ये आणि थेंबांची बरसात कर. भावपूर्ण शब्दांत काळजाची व्यथा या ओळींमधून प्रकर्षाने व प्रत्ययकारी रितीने व्यक्त झाली आहे. (२)
'शेला हिरवा पांघर (आ) कवयित्रींनी उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना (इ) 'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे (अभिव्यक्ती) (अ) तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा. (आ) पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा. (इ) पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा. (५) प्राणसई-रसग्रहण आर्तता, भावपूर्णता नि उत्कटता हे या
कवितेचे स्थायीगुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळेमुळे या कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे. |